Premium

“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले… 

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात.

nana patole devendra fadanvis eknath shinde
नाना पटोले, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे

गोंदिया : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर यांचा दौरा तपासला तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली वारी मध्येच जास्त वेळ घालवतात. राज्याच्या जनतेकरिता फक्त घोषणा देणे, दिल्लीवाले पंतप्रधान देशासाठी घोषणा करतात तसे हे राज्य वाले राज्यात घोषणांचा पाऊस पाडण्याचा काम करतात, शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली गेली नाही, बेरोजगारांचे प्रश्न सोडवले नाहीत, महागाई कमी करू शकले नाही, त्यामुळे माझ्या मते तर हे डेपुटेशन वर असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यांना कायम दर दोन दिवस आड दिल्ली मध्ये बोलाविले जाते आणि त्या दिल्ली दरबारी हुजरेगिरी करण्याचा काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतात अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी केली. नाना पटोले यांच्या वाढ दिवसानिमित्त सालेभाटा येथे त्यांची लाडू तुला करण्यात आली या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. पुढे पटोले म्हणाले की अशी हुजरेगिरी महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्याला भूषणावह नाही, नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री यांनी संभाजीनगर येथे सांगितले होते की आम्ही नरेंद्र मोदींचे हस्तक आहोत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या  जनतेचे हस्तक नाहीच, त्यामुळे त्यांच्या कडून जास्त काही अपेक्षा करण्याचे कारण नाही, असे ही या प्रसंगी नाना पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde devendra fadanvis delhi visit criticism nana patole sar 75 ysh

First published on: 05-06-2023 at 13:38 IST
Next Story
श्वासही घेणे झाले होते कठीण, अखेर ‘त्यांनी’ युवकास मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले