प्रतापनगरातील एका मैदानावर महापालिकेने जलकुंभाची उभारणी सुरू केली असून या जलकुंभातून प्रतापनगर भागातील वस्त्यांऐवजी इतर ठिकाणी पाणीपुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

प्रतापनगरातील गणेश कॉलनी, शांती निकेतन कॉलनी व रेल्वे कॉलनी या तीन वस्त्यांचे मिळून गणेश कॉलनीत एक मैदान आहे. या मैदानावर आता जलकुंभ उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, या जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा या भागांतील वस्त्यांना होणार नाही तर तेथून इतर वस्त्यांसाठी पाणी नेण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
nagpur, Voters Confused, polling station, Voters Confused between polling station, new hyderabad house, old hyderabad house, voting 2024, lok sabha 2024, election 2024, nagpur news, voting news, marathi news,
नागपूर : पत्त्यावरून गोंधळ! कोणत्या हैदराबाद हाउसमध्ये मतदान कराव? मतदात्यांचा अधिकाऱ्यांना…
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?

हेही वाचा – केसीआर यांची महाराष्ट्रात मोर्चेबांधणी, ‘बीआरएस’ गडचिरोलीतून लढणार विधानसभा; माजी आमदार लागले गळाला

हेही वाचा – नागपूर : २२ उमेदवार, २८ टेबल, प्रत्येक टेबलवर हजार मतपत्रिका; ‘शिक्षक’ची मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजतापासून

दुसऱ्या वस्तीसाठी पाण्याची सोय करायची असेल तर त्यासाठी गणेश कॉलनीतील मैदानात जलकुंभ उभारण्याची गरज काय, असा सवाल नागरिकांनी केला आहे. गणेश कॉलनी, शांती निकेतन रेल्वे कॉलनीला सध्या गोपालनगरमधून पाणीपुरवठा केला जातो. तो कमी दाबाने होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे नवीन जलकुंभातून या भागातील वस्त्यांनाही पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.