लोकसत्ता टीम

नागपूर : ‘फेइंजल’ चक्रीवादळाने राज्यातीलच नाही तर देशातील वातावरणाची गणिते बदलली आहेत. थंडीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना आता कुठे थंडीचा आनंद घेता येऊ लागला होता. मात्र, “फेइंजल” ने या आनंदावर विरजण घातले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली असून राज्यातील एकूणच कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.

climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
la nina become active in the pacific ocean impact on kharif crop
ला निना सक्रिय… रब्बी पिकांना फायदा? पण परिणाम अल्पकालीनच?
Union Carbide waste disposal issue
‘युनियन कार्बाईड’च्या कचऱ्याचा प्रश्न उग्र का झाला? हा कचरा मूळ वायूइतकाच अतिधोकादायक? दुर्घटनेची शक्यता किती?
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
2024 hottest year recorded in the world
विश्लेषण : २०२४ आजवरचे सर्वांत उष्ण वर्ष कसे ठरले? २०२५मध्येही हीच स्थिती?
Vidarbha lowest temperature winter
विदर्भात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

“फेइंजल” चक्रीवादळामुले उत्तरेकडील शीतलहरी राज्याकडे येत आहेत. आज संपूर्ण राज्यातच ढगाळ हवामान आहे. तर भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक शहरातील कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. ३० अंश सेल्सिअस च्या आत हे तापमान होते. मात्र, कालपासून या तापमानात वाढ झाली असून कमाल तापमानाने ३० अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला आहे. राज्यातील किमान तापमानात देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. अनेक शहरांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या होत्या. मात्र, कालपासून किमान तापमानात देखील वाढ होऊन ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.

आणखी वाचा-रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीस तात्पुरती बंदी, काय आहे कारण?

दरम्यान आता हवामान खात्याने सोमवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणेकडील एटापली आणि सिरोंचा या तालुक्यांमध्ये पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नांदेड, लातूर, आणि सोलापूरसह काही इतर जिल्ह्यांमध्ये कमी उंचावरचे ढग पाहायला मिळतील. या ठिकाणी हवामान बदलाचा परिणाम जाणवू शकतो.

आणखी वाचा-मानव – वन्यजीव संघर्ष : ४ वर्षांत ५९ वाघ, ३९ बिबट्या अन् १४६ नागरिकांचा मृत्यू

‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्याने राज्यात थंडी कमी होत आहे. जळगाव, धुळे, आणि नाशिकच्या काही भागांपुरतीच थंडी कमी होईल असा अंदाज आहे. तर दक्षिणेकडे मात्र तापमान वाढत राहील. पुणे आणि साताऱ्यात तापमान १३ ते १५ अंश सेल्सिअस दरम्यान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागांतही तापमान वाढण्याची शक्यता आहे. एकूणच राज्यात पुढील काही दिवस थंडी कमी होत जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा प्रभाव कमी प्रमाणात दिसेल. श्रीलंकेजवळ तयार झालेले चक्रीवादळ ‘फेइंजल’ हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. पुदुचेरीजवळ हे वादळ धडकण्याचा अंदाज आहे.

Story img Loader