चंद्रपूरमधील सावली तालुक्यातील बेलगाव येथील सरपंच अंबादास पाल यांचा विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंबादास शेतात कामासाठी गेले असता आज सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : दुचाकीने कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला धडकली ‘आपली बस’

विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे मृत्यू

बेलगाव येथील शेतकरी तथा सरपंच अंबादास पाल हे नेहमीप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतात धानपिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतात विद्युत प्रवाह सुरू असलेली तार जमिनीवर पडून होती. या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा- अस्वस्थ वाटल्याने प्रवाशांना उतरवले मात्र दवाखान्यात जात असताना कॅब चालकाला मृत्यूने गाठले

पोलिसांकडून तपास सुरु

घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पाथरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील कार्यवाही केली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अंबादास पाल यांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of sarpanch due to electric shock in chandrapur dpj
First published on: 20-09-2022 at 14:44 IST