प्रशांत देशमुख

वर्धा : नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेची चिंता संपेल, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील आज सकाळच्या सत्रात ते बोलत होते. याच वेळी त्यांनी शताब्दी वर्षानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्याचे जाहीर केले.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
eknath shinde and uddhav thackeray
मोदींची वक्रदृष्टी पडल्यास तोंडाला फेस येईल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
shrikant shinde on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा >>>वर्धा: पोलिसांनी अडवली साहित्यप्रेमींची वाट; उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या शैक्षणिक धोरणात भाषांना नवी दिशा देण्याचे सामर्थ्य आहे. मराठी ज्ञान भाषा आहेच, आता सगळ्या प्रकारचे शिक्षण मराठीतून मिळेल. परिणामी मराठी व्यवहारातील ज्ञानभाषा होईल. त्यामुळे मराठीबाबत व्यक्त होत असलेली चिंता पुढे राहणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, खासदार रामदास तडस व डॉ. अनिल बोंडे, आमदार डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, समीर मेघे तसेच कार्याध्यक्ष प्रदीप दाते व सागर मेघे यांची उपस्थिती होती.