”काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे रोज वेगवेगळे आरोप करीत असतात. प्रसारमाध्यमे त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे उलट-सुलट आरोप करून ते लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तेवढेच काम आहे, आम्हाला भरपूर कामे करायची आहेत”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

हेही वाचा >>>नागपूर : समृद्धी महामार्ग, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्याच हस्ते – फडणवीस

शिंदे-फडणवीस सरकार हे ‘ईडी’ सरकार असून सक्तवसूली संचालनालयाची (ईडी) कारवाई केवळ विरोधी पक्षातील नेत्यांवर होत आहे, भाजपच्या एकाही नेत्यावर केली जात नाही, असा आरोप पटोले यांनी केल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले असता, ते म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही, ते रोज असे आरोप करीत असतात.

हेही वाचा >>>नागपूर : दसऱ्याला ८५ हजार जणांनी केला मेट्रोने प्रवास

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२१-२२ या वर्षातील अखर्चित निधीचा आढावा घेण्यात आला. तो योग्य ठिकाणी खर्च होत असेल, तर त्याला मान्यता दिली जाईल, अन्यथा तो योग्य कामांवर वळवला जाईल. गेल्या सरकारच्या काळात झालेल्या कामांबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्याची माहिती घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.