चंद्रपूर : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला यश आले आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांनी ओबीसी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात कोणत्याही परिस्थिती समावेश केला जाणार नसून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: टोंगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी शनिवार ३० सप्टेंबरला चंद्रपूरात येणार आहे.

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपूर व चंद्रपूरात आंदोलन पुकारले होते. चंद्रपूरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला १९ दिवस पूर्ण झाले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान ओबीसी आंदोलनाचा वाढता दबाव पाहून सरकारने मुंबई येथे २९ सप्टेंबरला आंदोलक ओबीसी संघटनांची बैठक बोलावली.

Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
ncp leader ajit pawar launch connect with people initiative
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा जनता संवाद उपक्रम; आठवड्यातील तीन दिवस मंत्री पक्षाच्या मुख्यालयात
Sub Registrar Office, Registration , Devendra Fadnavis,
कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Loksatta editorial US National Security Advisor Jake Sullivan Nuclear deal Narendra Modi
अग्रलेख: अणू हवा,‘अरेवा’ नको!
JEE Mains Session 1 schedule announced Pune news
‘जेईई मुख्य’ सत्र एकचे वेळापत्रक जाहीर… कधी होणार परीक्षा?
wholesale price index base year
घाऊक किंमत निर्देशांकाचे आधार वर्ष बदलणार, रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राकडून समिती

हेही वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेर, ‘महात्मा गांधी म्हणत गावाकडे चला अन् आता…’

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांनी ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य केल्या आहे. मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. मराठा समाजाचा कोणत्याही परिस्थिती ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जाणार नसून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरात मागील १९ दिवसांपासून सुरू असलेले रविंद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविण्यासाठी ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी ९ वाजता चंद्रपूरात येणार आहे.

हेही वाचा : अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

जिल्हा बंद आंदोलन स्थगित

ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य करण्यात आल्याने तसेच मराठा समाजाचा कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जाणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिल्याने आज ३० सप्टेंबर २०२३ ला होणारे चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी सांगितले.

Story img Loader