नागपूर : इतवारी (नागपूर) ते छिंदवाडा रेल्वे मार्गावरील पूल पावसामुळे खचला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. या पुलाचे काम मे २०२५ पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इतवारी-छिंदवाडा रेल्वे ब्रॉडगेजचे काम पूर्ण करून फेब्रुवारी २०२१ ला या मार्गावर रेल्वेगाडी सुरु करण्यात आली होती. पावसामुळे या मार्गावरील भंडारकुंड-भिमालगोंडी दरम्यानच्या रेल्वे पुलास तडे गेले. ही घटना ऑगस्ट २०२४ घडली आणि एकच खळबळ उडाली. कारण, केवळ साडेतीन वर्षांत पूल क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे या मार्गावरील तीन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.  इतवारी-शाहडोल एक्स्प्रेसचा मार्गात बदल करण्यात आला आहे. ही गाडी आमला मार्ग सुरू आहे. आता या रेल्वे पुलाचे मे २०२५ पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच गाड्या पूर्ववत होणार आहेत.

Indore Nagpur Vande Bharat Express timings schedule update
वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळेत उद्यापासून बदल…तुम्ही प्रवास करणार असाल तर आधी….
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Payments of Rs 400 crores pending from contractor in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्यातील कंत्राटदार आर्थिक अडचणीत, ४०० कोटींची देयके प्रलंबित
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
tehsildar issued notices to 109 plot holders in Chandrapurs Blue Line area to stop unauthorized construction
चंद्रपूर शहरालगत दहा गावातील १०९ अनधिकृत ले आऊट धारकांना नोटीस
Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
Movement to resume Kisan Special Train services
किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली
Nagpur to Sikandarbad Vande Bharat Express coaches to be reduced
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेसला अल्प प्रतिसाद,डबे कमी होणार

इतवारी -छिंदवाडा १४९.५२२ कि.मी. रेल्वेमार्गाच्या ब्रॉडगेजचे काम २०२१ पूर्ण झाले. या प्रकल्पावर एकूण ५८५ कोटी ९३ लाख रुपयांचा खर्च झाला. या मार्गावर २६ मोठे आणि २५० छोटे पूल आहेत. यापैकी २१ मोठय़ा आणि ५० छोटय़ा पुलांचे काम झाले आहे. या मार्गावरील केवळ सौंसर, रामाकोना आणि विमलगुडा रेल्वे स्थानक आहेत.   

इतवारी ते नागभीड मार्ग

इतवारी ते नागभीड ११० किलोमीटर रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. इतवारी ते उमरेड दरम्यानचे ५५ किलोमीटर मार्गाचे जवळपास पूर्ण असून तो जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तर उमरेड ते नागपूर या रेल्वे मार्गाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपक गुप्ता यांनी दिली.

इतवारी ते नागभीड हा १०६.२ किलोमीटर रेल्वेमार्ग प्रकल्प साकारला जात आहे. महारेल हे काम करीत आहे. 

इतवारी ते उमरेड रेल्वेमार्गाचे काम येत्या जून पर्यंत आणि उमरेड ते नागभीड रेल्वेच्या मार्गाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

 नागपूर ते उमरेडपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर उमरेड ते नागभीड मार्गाचे काम सुरू आहे. उमरेडजवळ गतिशक्ती योजनेअंतर्गत गुड्स टर्मिनल विकसित करण्यात येत आहे. हा मालधक्का वेस्टर्न कोलफिल्ड लि.चा राहणार आहे.

Story img Loader