नागपूर: सी.-२० परिषदेसाठी नागपूर विजेच्या दिव्यांनी  उजळून निघत असताना ग्रामीण भागात मात्र नापिकीआणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक हानी मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आंधार निर्माण झाला आहे. नागपूर नजीकच्या कोंढळाजवळील पांजरा(काटे) येथील वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी, पावसामुळे पीक हानीमुळे शातातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पांजरा काटे येथील शेतकरी विद्याधर पांडूरंग सरोदे (६३) सततच्या नापिकीमुळे नैराश्यात गेले होते. त्यांच्यावर कर्जाचा बोझाही वाढला होता. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा,असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. याबाबत त्यांनी पत्नीकडे बोलूनही दाखवले होते. पत्नी रंजनाबाईने त्यांना धीरही दिला होता.  २० मार्चला सकाळी १०वाजता विद्याधर शेतीवर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. दुपारी १२वाजे पर्यंत परत आले नाही म्हणून त्यांचा कुटुंबियांनी शोध घेतला. शेतातील विहीरीलगत त्यांच्या चपला सापडल्या. विहीरत शोध घेतला असता तेथे विद्याधरचा मृतदेह सापडला. याबाबबत कोंढाळी पोलीस ठाण्यात विद्याधर यांचा मुलगा कृष्ण सरोदे यांनी तक्रार केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पार्थिव विच्छेदनकाकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Sameer Wankhede
समीर वानखेडे यांच्यावरील अनियमिततेचे आरोप गंभीर असल्यानेच चौकशी, एनसीबीचा उच्च न्यायालयात दावा
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला