बुलढाणा : औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या आणि कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराची तीव्रता वाढली आहे. परिणामी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांकडे मजुरांचा ओढा वाढला आहे. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील ‘मनरेगा’च्या कामांवर जवळपास १५ हजार मजूर कार्यरत असल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.

जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत १४०० गावे व ८८९ ग्रामपंचायती आहेत. यामुळे १३ तालुके (नगरी भाग)वगळता ग्रामीण भागाची व्याप्ती मोठी आहे. कृषी प्रधान बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांखालील क्षेत्र साडेसात लाख, तर रब्बी पिकांखालील क्षेत्र सव्वालाखाच्या आसपास आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे हाच रोजगार आहे. खरीप हंगामात शेतीची कामे जास्त राहतात. त्यातुलनेत रब्बी हंगामात मजुरीची कामे कमी असतात. आता रब्बीची कामे कमी झाल्याने ग्रामीण मजुरांचा कल रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वाढला आहे.

name of a Bangladeshi was found in the voter list of Narayangaon Gram Panchayat
नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे पकडलेल्या ३ जणांनी काढले होते नारायणगाव येथे आधारकार्ड
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
भाजपची चतुर खेळी,जि.प.चा रोखलेला निधी केला मंजूर
भाजपची चतुर खेळी,जि.प.चा रोखलेला निधी केला मंजूर
Stop adulteration in milk otherwise action will be taken says Babasaheb Patil warns
दुधातील भेसळ थांबवा, अन्यथा कारवाई; बाबासाहेब पाटील यांचा इशारा
Most indebted farmers Punjab, Maharashtra
महाराष्ट्र नव्हे पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Budget 2025 for Middle Class Nirmala Sitharaman GDP Growth Rate
मेरे पास मिडलक्लास है! प्राप्तिकरदाता, बिहार, ‘गिग’ कामगारांसाठी भरीव तरतुदी

हेही वाचा >>>बुलढाणा : केवळ ४० हजारांसाठी दरोडेखोरांनी जीव घेतला, घरी सीसीटीव्ही यंत्रणा आणली, पण…

यंदाच्या वर्षी यात कैकपटीने वाढ झाली असल्याचे आढळून आले. एरवी जानेवारी महिन्यात ‘मनरेगा’च्या कामावरील मजुरांची संख्या सात ते नऊ हजारांच्यादरम्यान राहते. मात्र आजमितीला १३ तालुक्यातील २६०२ कामांवर १४,८६३ मजूर कामांवर असल्याचे चित्र आहे. यामुळे हजारो मजुरांना गावालगत रोजगार मिळाला आहे. शेतीची कामे कमी असल्याने जास्त संख्येने मजूर ‘रोहयो’कडे वळले आहेत. पाचशे ग्रामपंचायत क्षेत्रात ही कामे सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरकुलांच्या कामांची संख्या जास्त आहे. याशिवाय सिंचन विहीर, फळबाग लागवड, वृक्षारोपण, पांदण रस्त्यांची कामेही सुरू आहेत. संग्रामपूर, सिंदखेडराजा, चिखली, खामगाव, बुलढाणा, मेहकर या तालुक्यांतील कामे आणि मजूरसंख्या जास्त आहे.

Story img Loader