माजी आमदार डॉ. वसंत बोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून के.चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे.
शेतकरी संघटनेनंतर प्रथमच शेतकऱ्यांचा विचार घेऊन के. चंद्रशेखर यांचा पक्ष काम करीत आहे. त्यामुळे मी या पक्षात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा >>>भंडारा: शेतकऱ्याला हरभऱ्याच्या शेतात निद्रावस्थेत वाघ दिसला, पुढे झाले असे की…

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’
excitement in the NCP Congress After the announcement of candidature of Sunil Tatkare
रायगड : सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह…
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांच्या अटकेमुळे निवडणुकीत आम आदमी पार्टीला…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “मी इंडियाचा घटक म्हणून…”

डॉ. वसंत बोंडे हे सन १९८५ आणि सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हिंगणघाट मतदारसंघात दोनदा विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत या पक्षाकरीता काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांची नाममात्र हजेरी होती. तसेच या काळात त्यांनी कुठल्याही निवडणुकीत भाग घेतला नव्हता.