नागपूर : आठव्या वर्गात नापास झाल्यामुळे पालकांच्या भीतीपोटी मुलीने थेट घरातून पलायन केले. नातेवाईकाच्या घरी जाण्यासाठी निघालेली मुलगी एका युवकाच्या प्रेमात पडली. अवघ्या १५ व्या वर्षी तिचे लग्न झाले आणि आठ वर्षांनंतर तिचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी ती मुलगी ३ मुलांची आई होती. मात्र, घरातून निघून गेलेली एकुलती मुलगी पालकांना दिसताच त्यांनी तिचा स्वीकार केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी परिसरातील एका फर्निचर व्यावसायिकाला टीना (काल्पनिक नाव) एकुलती मुलगी होती. ती आठव्या वर्गात नापास झाली. घरी गेल्यानंतर तापट स्वभावाचे वडिल मारतील किंवा ओरडतील, अशी भीतीपोटी तिने थेट घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. बिहारला जाणाऱ्या रेल्वेत बसून मुलगी निघून गेली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिचा आठ वर्षे कोणताही शोध लागला नाही. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली. एकुलती मुलगी जिवंत आहे किंवा नाही, याबाबतही संशय त्यांना होता. शेवटी हे प्रकरण मानवी तस्करी विरोधी पथकच्या (एएचटीयू) रेखा संकपाळ यांच्याकडे आले. मुलगी बेपत्ता असल्याबाबत कोणताही सुगावा नसताना सलग ३ महिने परीश्रम घेतले. अखेर मुलीच्या अपहरणाचा तपासाचा धागा सापडला. मुलगी जिवंत असल्याचे निरोप तिच्या आईवडिलांना दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl failed in exam ran away from fear of parents marriage in bihar adk 83 ysh
First published on: 21-03-2023 at 17:18 IST