लोकसत्ता टीम

गोंदिया: राज्यात वाळू तस्कर निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. महाराष्ट्रात घरकुलासाठी वाळू मिळत नाही, यामुळे सर्वसामान्यांना घर बनवता येत नाही. या करिता एक धोरण आम्ही या सरकारला तयार करायला सांगतो आहे पण हे तस्कराचे सरकार धोरण करायला तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लूट करणारा भाजपा तस्कर निर्माण करणारा पक्ष आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Bhandara Gondia Constituency, BJP, Appoints, Assess, Lok Sabha Candidate, Observers, chitra wagh
भंडारा : घरचा की बाहेरचा? भाजपच्या निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली मते, गोपनीय अहवाल…
mahavikas aghadi prakash ambedkar marathi news, prakash ambedkar latest marathi news, prakash ambedkar mahavikas aghadi marathi news
वंचितबरोबर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित
congrsss himachal pradesh government in trouble
हिमाचल प्रदेशात काँग्रेस सरकार धोक्यात? आमदारांच्या पळवापळवीचा मुख्यमंत्री सुक्खूंचा आरोप

आणखी वाचा- वर्धा : महिलेकडून मोपेडमधून दारूची वाहतूक; सव्वा लाखाचा साठा पकडला

एका कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यात आले असता ते बोलत होते. पाटोळे पुढे म्हणाले, मध्यप्रदेशात माफियांच्या माध्यमातून तेथील सरकारने नदिमधील वाळू गायब करून टाकली. तेथील सरकारच वाळू माफियांचे काम करते, असे चित्र आहे. तेच कृत्य आज महाराष्ट्रात भाजपच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळेच नागपूरचे जे काही पार्सल तुम्ही इथून पाठवलं होत त्याच पार्सलच्या माध्यमातून लूट सुरू आहे. गुजरातमध्ये दारूबंदी आहे, पण तेथील भाजपाचे सगळे नेते आणि त्यांचे बगलबच्चे तिथं अवैधरित्या दारु विक्री करतात आणि दारू विकून जास्त पैसे कमवितात, असे तिथे निवडणूक प्रचारासाठी गेलो असता समजले, असेही नाना पटोले यांनी सांगितले.