वाशीम : लहान लहान राज्ये झाल्यास विकासाला चालना मिळते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. वेगळा विदर्भ व्हावा. ही फार जुनी मागणी आहे. अनेकांनी अनेकवेळा लढा दिला आहे. परंतु, वेगळा विदर्भ म्हटले की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचाच विरोध असतो. परंतु, भाजपा सरकारमुळे सध्या अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे विदर्भासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू, असे प्रतिपादन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले.
स्वतंत्र विदर्भ व्हावा, या मागणीसाठी आज विदर्भवादी संघटनेच्या वतीने शहरात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ॲड. जयश्री पाटील, महेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ॲड. सदावर्ते म्हणाले की, स्वतंत्र विदर्भ व्हावा, यासाठी अनेकांनी लढा दिला. मात्र, विदर्भाला शरद पवार, उद्धव ठाकरे,
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunaratna sadavarte commented on vidarbha in washim pbk 85 ssb