वर्धा : आज, गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका  बसला. देवळी तालुक्यात एक म्हैस तसेच समुद्रपूर तालुक्यात दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले. देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील सुभाष गामे यांच्या घराचे टिनाचे छत उडून गेले. गोठ्यांचे नुकसान झाले. गावात लिंबाएवढ्या गारांचा खच पडला. गावकरी या प्रकोपने हादरून गेले आहेत. हिंगणघाट येथे सर्वाधिक ३५ मिमी पाऊस पडला, तर कानदगाव मंडळात ४९ मिमी अशी विक्रमी पर्जन्यमान झाले आहे. आष्टी, आर्वी, कारंजा येथील संत्रा तर सेलू तालुक्यात पपई बाग उद्ध्वस्त झाली आहे. आर्वी,सेलू,वर्धा येथील फुलशेतीचे पण मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
kalyan dombivli rain marathi news, rain starts in kalyan marathi news
कल्याण डोंबिवलीत अवकाळी पावसाच्या सरी
15 percent water cut across Mumbai till March mumbai print news
५ मार्चपर्यंत संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणी कपात; पिसे उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मर सुरु होण्यास वेळ लागणार