नागपूर: काँग्रेसने जेव्हा इंग्रजांना मदत करणारे,. इंग्रज सरकारकडून पेंशन घेणाऱ्याच्या कबरी उदध्वस्त करा, अशी मागणी केली. तेव्हा भाजप, संघ यांना दुसऱ्याचे घर जा ळल्यास आपलेही घरी जळू शकते हे लक्षात आल्यावर भाजपने औरंगजेबच्या कबीरच्या मुद्याला बाजूला सारला, अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना शांती यात्रेत केली. नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने बुधवारी सदभावना शांती यात्रा काढली. रजवाडा पॅलेस येथे यात्रेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, हे लोक स्वातंत्र्य नको, विषमता, अस्पृश्यता हवी असे म्हणते होते. इंग्रजांना मदत करत होते. इंग्रज सरकारकडून पेंशन घेत होते. त्यांच्या कबरी उदध्वस्त करण्याचे आव्हान काँग्रेसने केले. त्यानंतर भाजपने औरंगजेबच्या कबीरच्या मुद्यावरून भूमिका बदलली. बीडमध्ये टोळकांचे राज्य चालत आहे. सरपंच देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर तेथील जनता संतप्त झाली. ही जनता मंत्रालयात धडक देईल, अशी परिस्थिती होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला, असा दावाही सपकाळ यांनी केला.

विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पुरोगामी विचाराने चालवणाऱ्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम केले. संविधानाची शपथ घेतलेले मंत्री जाती धर्माच्या नावाने वाद निर्माण करत आहेत. एक मंत्री मशिदीत घुसून मारण्याची धमकी देतो पण मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले त्याप्रकरणी अधिकाऱ्यांना आता माफी मागावी लागली. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारचा नपुंसक सरकार असा उल्लेख केला हे लाजीरवाणे आहे असे वडेट्टीवार म्हणाले.

दंगल घडणाऱ्याला पंतप्रधान म्हणून बघणे दुर्देवी

२००२ मध्ये गुजरात पेटवण्यात आले. त्यावेळी एका दाढीवाल्याला कोणी अडवले नाही. ज्यांनी गुजरातमध्ये दंगल घडवली. त्यांना पंतप्रधान म्हणून बघणे लागणे दुर्देवी आहे. काँग्रेसने जे स्वातंत्र्य नको, विषमता, अस्पृश्यता हवी असे म्हणते होते. इंग्रजांना मदत करत होते. इंग्रज सरकारकडून पेंशन घेत होते. त्यांच्या कबरी उदध्वस्त करा, अशी मागणी केली. त्यानंतर भाजपने औरंगजेबच्या कबीरच्या मुद्याला बाजूला सारले. बीडमध्ये टोळकांचे राज्य चालत आहे. सरपंच देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर तेथील जनता संतप्त झाली. ही जनता मंत्रालयात घुसतील, अशी परिस्थिती होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यात आला, असा दावाही सपकाळ यांनी केला.

पोलिसांनी शांती यात्रेचा मार्ग बदलला

काँग्रेसने नागपूर शहर पोलिसांकडून सदभावना शांती यात्रेची पूर्वपरवानगी घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, गांधी गेट महाल येथून यात्रेला प्रारंभ होणार होता. आणि नरसिंग टॉकिज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क चौक, देवडिया काँग्रेस भवन, भालदारपुरा चौक, गंजीपेठ, गांधी पुतळा असा प्रवास करीत रजवाडा पॅलेस येथे यात्रेचा समारोप होईल, असे ठरले होते. परंतु यात्रेच्या आदल्या रात्री पोलिसांनी यात्रेचा मार्गच बदलला. त्यामुळे सदभावना यात्रा गांधी गेट महाल येथून टिळक पुतळा चौकातून थेट रजवाडा पॅलेसमध्ये पोहोचली. नागपूर पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे व इतर नेत्यांची सत्यशोधन समितीला घटनास्थळाला भेट देण्यापासून रोखले होते.

दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंदिर, ताजुद्दीन बाबा

काँग्रेस नेत्यांनी दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सदभावनेचे साकडे घातले. या यात्रेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, अनिस अहमद, खासदार प्रतिभा धानोरकर, नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

क्षणचित्रे :

-सर्वधर्म समभाव आणि सदभावनेचा संदेश देण्यासाठी भारत माता, हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध धम्माचे धर्मगुरु तसेच महात्मा गांधी यांची वेशभूषा धारण केलेले बालक सदभावना शांती यात्रेच्या रथावर सवार झाले होते.

-संविधानाच्या प्रास्ताविका हातात घेऊन युवक यात्रेत सहभागी झाले होते.

-काही युवकांनी जयभीम लिहलेल्या टोप्या परधीन केल्या होत्या.

-काँग्रेसचे जुने निष्ठावंत वयोवृद्ध कार्यकर्ते काठी आधार घेत यात्रेत सहभागी झाले होती.

-अनेक महिलांनी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते.

-रघुपती राघव राजाराम सबको सम्मती दे भगवान आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे गीत वाजण्यात येत होते.