विदर्भातील विविध भागांमध्ये रविवार सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवलेली आहे. या तीन दिवसात विदर्भात ११ जण वाहून गेले.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात बेंबाळा नदीत ट्रॅक्टरसह पाच जण वाहून गेले. यातील दोघांना वाचवण्यात यश आले असले तरीही तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. पुलावरून पाणी वाहत असतानाही पुलावर ट्रॅक्टर चालविणे जीवावर बेतले.

PHOTOS : विदर्भात पावसाचा पुन्हा कहर

गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीसह नाल्यांना आलेल्या पुरामुळे आलपल्ली ताडगाव भामरागड मार्ग, तळोधी आमगाव एटापल्ली, चतगाव करवाफ पोटेगाव, कसनसुर एटापल्ली आलापल्ली, सिरोंचा कलेश्वराम वारंगल हैदराबाद, अहेरी बेजूरपल्ली परसेवाडा हे मार्ग बंदच आहेत.