शिवसेनेने शांततेच्या मार्गाने व संयमाने हा विषय हाताळल्यास शिवसेनेचे ५० टक्के आमदार स्वगृही परततील, असा विश्वास पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीने शिवसेनेत फुट पडली आहे. त्यामुळे शिवसेना कार्याध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा विषय संयम व शांततेने सोडविणे गरजेचे आहे. शांततेच्या मार्गाने किमान ५० टक्के आमदार स्वगृही परतू शकतात, असे सांगत गुवाहाटीतील बंडखोर शिवसेना आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन धानोरकर यांनी केले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवले. मात्र, आता अचानक असे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करत यामागे भाजपाचा हात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या बंडखोर आमदारांना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ नको असेल, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ. मात्र, भाजपाला रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे खासदार धानोरकर म्हणाले. बंडखोर शिवसेना आमदारांच्या कार्यालयांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. समेट व्हायला हवा, नाहीतर दरी वाढून वेगळे वळण मिळेल.”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If shiv sena handles the issue peacefully 50 per cent mlas will return home mp dhanorkar msr
First published on: 26-06-2022 at 15:43 IST