अमरावती : मेळघाटातील धारणी व चिखलदरा हा या दोन्ही तालुक्‍यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आदिवासी वस्त्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. रात्रीबेरात्री पाण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती सुरू आहे. सध्‍या सात गावांमध्‍ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्‍यात आला आहे. मेळघाटातील बेला, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहाद्दरपूर आणि गौलखेडा बाजार तसेच चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील सावंगी मग्रापूर या गावांध्‍ये अकरा टँकरच्‍या सहाय्याने पिण्‍याचे पाणी पुरविण्‍यात येत आहे. या गावांध्‍ये जलजीवन मिशनची कामे अपूर्णावस्‍थेत असल्‍याने तात्‍पुरती उपाययोजना म्‍हणून टँकरने पाणी पुरवठा करण्‍यात येत आहे.

मेळघाट हा डोंगरदऱ्यांचा भाग असून पावसाचे पाणी उतारावरून वाहून जाते. या पाण्याचा फायदा जिल्ह्यातील इतर भागांना होतो. पण मेळघाटातील छोटे पाडे, वस्त्या, ढाणा तहानलेलेच राहतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्‍न डोके वर काढतो; आणि पाऊस आला की हा प्रश्‍न पुन्हा दुसऱ्याच वर्षी चर्चेला येतो. गेल्या दोन दशकांपासून हेच सुरू आहे. परंतु, कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. जलसंधारणाच्या नावावर मेळघाटात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्यक्षात पाण्याचा साठा होताना दिसत नाही.

koyapunem festival started on monday february 10 on magh purnima at kachargad shrine of tribals it will last for five days
आदिवासींचा “कोयापुनेम” महोत्सव काय आहे? आजपासून सुरुवात
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
alcoholic son sets mother on fire news in marathi
क्षुल्लक कारणावरून दारुड्याने आईला पेटवले
Ashes from a crematorium are falling into Virar swimming pool waters
स्मशानभूमीतील राख पालिकेच्या जलतरणतलावात, विरारच्या फुलपाडा येथील प्रकार
bmc stops immersion of pops ganesh idols due to court order
विसर्जनाविनाच गणेशमूर्ती मंडपात माघारी; न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन रोखले
sambar marathi news
सातारा: पाचगणीत आढळले दुर्मीळ पांढरे सांबर
indapur dam latest news in marathi
खडकवासला धरणसाखळीतून कालव्यात पाणी सोडण्यास विलंब; इंदापुरातील शेतीला फटका
Despite spending crores Melghat faces water shortage this year too
कोट्यवधींचा खर्च, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’च, मेळघाटात यंदाही पाणीटंचाईचे चटके

हेही वाचा : फडणवीस यांचा रामटेकमध्ये काय आहे प्लॅन ‘बी ‘ ?

मेळघाटात पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न बिकट झाला आहे. जेथे माणसालाच पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे पशूंची अवस्था आणखी बिकट आहे. गुरांना पाणी पाजण्यासाठी मेळघाटात आदिवासी बांधव आठ ते दहा किलोमीटर पायपीट करून जात असल्याची स्थिती आहे.

हेही वाचा : नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल

रखरखीत उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने तात्पुरत्या उपाययोजना म्हणून जिल्‍ह्यात सद्यस्थितीत खासगी ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यंदा पावसाळ्यात चांदूर बाजार वगळता इतर १३ तालुक्‍यांमध्‍ये पावसाने सरासरी ओलांडली नाही. जलपुनर्भरण योग्‍यरीत्‍या न झाल्‍याने भूजल पातळी खालावली आहे.

Story img Loader