बुलढाणा: शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या आरोप प्रत्यारोपचा कलगीतुरा रंगला असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या वादात उडी घेतली. आमदार गायकवाड यांनी नामदार जाधव यांच्याविरोधात केलेले आरोप गंभीर असून त्यात तथ्य आहे.आपल्याच पक्षातील सहकाऱ्याचे पंख छाटण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून तुपकरांची आगीत तेल ओतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत ‘तटस्थ’ राहिल्यावर आणि निकाल लागून दहा दिवस उलटल्यावर तुपकरांनी आपले मौन सोडून राजकीय वर्तुळात पुन्हा धमाल उडवून दिली आहे. दोन खाजगी वृत्त वाहिन्यांशी बोलतांना त्यांनी आमदार गायकवाड यांचे एकप्रकारे समर्थन करताना कट्टर विरोधक प्रतापराव जाधव यांच्यावर शरसंधान साधले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘शांत’ राहिल्यावर आणि ८४१ मतांच्या अल्प फरकाने विजयी झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आपले मौन सोडले.

नुकतेच बुलढाण्यात पार पडलेल्या जाहीर सत्कार सभारंभात त्यांनी, केंद्रीयमंत्री जाधव आणि भाजपा नेते आमदार संजय कुटे यांनी (निवडणुकीत) आपले कामच केले नसल्याचे सांगितले.एवढेच नव्हे तर दोघांनी बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जयश्री शेळके यांना मिळवून दिली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)ने आपले कामच केले नसल्याचे सांगून आमदार गायकवाड यांनी मनातील खदखद बोलून दाखविली. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना नामदार जाधव यांनी , बुलढाण्याचा उमेदवार सक्षम होता, त्यांनी माझीच काय मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचारसभा नाकारली , असा गौप्यस्फोट केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ‘कोणी काय केले’हे त्यांना चांगलंच ठाऊक असल्याचे सांगून त्यांनी आमदाराना डिवचले.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”

हेही वाचा : गटनेता निवडीच्या बैठकीत अकोल्याला मानाचे स्थान, आ. रणधीर सावरकरांवर…

तुपकर म्हणतात जाधवांना मी ‘कुठेच नको आहे

शिंदे गटातील हा वाद भडकला असतानाच रविकांत तुपकर यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. बुलढाण्यात मोजक्या माध्यम प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी, आमदार गायकवाड आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी केलेल्या गंभीर आरोपात तथ्य आहे. बुलढाणा विधानसभा संदर्भात आमच्या (तुपकर) उद्धव ठाकरे, अन्य नेते, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेस समवेत चर्चा झाल्या. उद्धव ठाकरे यांनी ‘एबी फॉर्म’ देण्याचे सूतोवाच करून ‘मतदारसंघात जाऊन या,कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि मुंबईत येऊन फॉर्म घेऊन जा’ असे सांगितले.

हेही वाचा : “देवेंद्रजींची मनिषा आम्ही पूर्ण केली, आज त्यांनी आमची…”, कोण म्हणतय असं?

मात्र माझी (उबाठाची) उमेदवारी नक्की झाल्यावर मात्र काही तासांत असे काही घडले की उबाठाची उमेदवारी जयश्री शेळके यांना जाहीर झाली. यामुळे आमदार गायकवाड यांनी उमेदवारी संदर्भात नामदार जाधव यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपात नक्कीच तथ्य आहे. तसेही प्रतापराव जाधव यांना मी राजकारणात ‘कुठेच नको आहे,’ असे सांगून तुपकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मी त्यांच्या विरोधात लढलो.याचा कदाचित त्यांना राग आहे.यामुळे माझी उमेदवारी ठरताच ठाकरे गटाचे पदाधिकारी, काँग्रेसचे एक आमदार एकत्र आले आणि काही तासातच बुलढाण्याची उमेदवारी जयश्री शेळकेंना जाहीर झाली असा दावा तुपकर यांनी बोलून दाखविला. यामुळे आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य आहे. हे आरोप गंभीर आहे. आपला एखादा सहकारी, चांगले काम करून मोठा होत असेल, शिंदे गटात त्याला मान मिळत असेल तर त्याचे पंख छाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप तुपकरांनी या चर्चेत केला आहे.

Story img Loader