नागपूर : महायुतीच्या नेत्यांवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी महाविकास आघाडीने केवळ श्याम मानवच नाही, तर ६८ लोकांची जहरी टीम तयार केली आहे. सामाजिक आरोग्य बिघडवून समाजात वाद निर्माण करण्यासाठी महाविकास आघाडीने वेगवेगळे केंद्र निर्माण केले आहे. श्याम मानव सारख्या व्यक्तीला समोर करुन काँग्रेसला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवायचे आहे, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजपच्या नेत्यावर त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने काही समाजातील वातावरण दूषित करण्यासाठी काही लोकांना समोर आणले आहे. वेळ आल्यावर त्या सर्वाची नावे जाहीर करणार असल्याचा गौफ्यस्फोट बावनकुळे यांनी केला. खरे तर कोणतीही तक्रार असेल तर २४ तासात दाखल करणे अपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील तक्रार असेल तर अनिल देशमुख यांनी त्याचवेळी तक्रार का केली नाही. राज्याचे माजी गृहमंत्री असलेले अनिल देशमुख इतके हतबल कसे असु शकतात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये राहिल्यास महाविकास आघाडीतील नेत्यांचा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढतील. त्यामुळे त्यांना थांबण्यासाठी काही लोकांकडून त्यांच्यावर आरोप करण्याचे काम सुरू आहे. समाजा-समाजात विभागणी करुन महाराष्ट्राला असुरक्षित करण्याचे काम इंडिया आघाडीचे नेते करत आहे मात्र राज्यातील जनता हे आता सहन करणार नाही. लोकसभेत कळले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत न दिल्यावर पाकिस्तानचे झेंडे मिरवणुकीमध्ये कसे फडकतात. या बद्दल जनता जागृत झाली आहे असेही बावनकुळे म्हणाले.
केंद्र सरकारने महाराष्ट्राला कुठेही मागे ठेवले नाही. महाराष्ट्राला भरभरुन दिले आाहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदीनी कितीतरी योजना राज्याला दिल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे गेल्या अडीच वर्ष सरकार असताना महाविकास आघाडीने अनेक योजना बंद पाडण्याचे काम केले आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सरकार आल्यानंतर पुन्हा त्या योजना पुन्हा सुरू केल्या आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खटाखट पैसे देण्याचे आश्र्वासन दिले होते.मात्र आमचे सरकार आल्यावर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमांतून पटापट काम करत असल्याने हे महाविकास आघाडीचे लोक पिसाळले असल्याचे बावनकुळे म्हणाले. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही त्यासाठी त्यांच्या टीकेवर व आरोपवर निलेश राणे बोलून त्यांना उत्तर देतील .
हेही वाचा : सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट अन् शेतकऱ्यासमोर उभा ठाकला वाघ; मग…
विदर्भात आणि नागपुरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या लोकांचे आणि ग्रामीण भागात शेतीवर झालेल्या पिकाो नुकसान झाले आहे त्यांना भरपाई मिळावी यासाठी हा आज दौरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार व परिस्थितीवर पालकमंत्री अजित पवार लक्ष ठेवून आहे.
© The Indian Express (P) Ltd