वर्धा : गेली दोन दिवस झालेल्या पावसाने शेतातील कापूस व तूर पिके उद्ध्वस्त झाली आहे. पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हजारो हेक्टरवरील कापूस पिके काळी पडली, तर तूरही गळू लागली आहे. वेचलेला कापूस ओलाचिंब झाल्याने निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. अशा संकटकाळी मदतीची नितांत गरज. म्हणून शेतकऱ्यांना सरकारने गाजावाजा करीत पीक विमा काढण्याचे केलेले आवाहन आठवले. एक रुपयात विमा काढणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनीचे दार ठोठावले. पण प्रतिसादच मिळाला नाही. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीला आला आहे.

हेही वाचा : उपराजधानीला आज व उद्या ‘यलो अलर्ट’; अवकाळी पावसाचे थैमान कायम

Farmers halted auctions in Lasalgaon demanding immediate cancellation of onion export duty
निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Error in gold import data due to double counting government clarification
दुहेरी मोजणीमुळे सोने आयातीच्या आकडेवारीत चूक – सरकारची स्पष्टोक्ती
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Deadline Looms as India Struggles to Meet Soybean Procuremen
शेतकऱ्यांपुढे नवेच संकट, ‘हे’च संपले म्हणून खरेदी ठप्प. जबाबदार कोण ?
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता

शेतकरी संघटनेचे राज्य पदाधिकारी सतीश दाणी यांना यावेळी आलेला अनुभव अत्यंत वाईट आहे. ते सांगतात की, मंगळवारी दिवसभर मी कंपनी कार्यालयाशी संपर्क केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. फोन उचलला जात नाही. थेट जायला मार्ग नाही. अनेकांची कार्यालये नागपुरात आहेत. मदत कशी मिळणार, याची चिंता सतावत आहे. कृषी खात्याने आता हस्तक्षेप करीत त्वरित पंचनामे केले पाहिजे. विम्याचा फायदा मिळायला नको का, असा सवालही दाणी यांनी केला. स्वतः त्यांचा साठ क्विंटल कापूस भिजल्याने खराब झाला. म्हणून ते विम्यासाठी धावपळ करीत आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसोबतही घडतो आहे. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी अशा दुहेरी संकटाच्या खाईत शेतकरी लोटला गेला आहे.

Story img Loader