वाशीम : मालेगांव तालुक्यातील करंजी येथील सुधाकर किसन कांबळे यांच्या गोठ्याला आज २८ फेब्रुवारी रोजी सकाळी अचानक आग लागली. आग एव्हढी भीषण होती की, गोठ्यातील ३९ शेळ्या व इतर साहित्य जाळून राख झाले आहे. यामुळे अंदाजे दहा लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा… ‘अवयव तस्करी प्रकरणाचा नक्षलवाद्यांशी संबंध.., गोंदियाचे ‘एसपी’ निखील पिंगळे म्हणाले, विशेष तपास सुरू

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

हेही वाचा… अहीरांच्या पराभवाला मुनगंटीवार तर माझ्या पराभवाला…, माजी खासदार चंद्रकात खैरेंचा थेट आरोप

करंजी येथील सुधाकर किसन कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेळी पालन करतात. त्यांच्या गोठ्यात ३९ बकऱ्या बांधलेल्या होत्या. आज २८ फेब्रुवारी रोजी सकाळी गोठ्याला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने क्षणात गोठ्यातील शेळ्या जळून खाक झाल्या. तसेच शेजारील शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले. तलाठ्यांनी पंचनामा केला असून १० लाख ५१ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या गोठ्याला लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.