समृध्दी महामार्ग सुरू झाला. त्याचे कौतुकही झाले. पण आता त्यावर प्रवास करतात येणाऱ्या अडचणीवर लोकं बोलू लागले आहेत. १०० किमीच्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट नाही. पेट्रोल पंप नाही. एवढेच काय तर गाडीला अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देणारी साधने नाहीत.

हेही वाचा- वेळेचीही ‘समृद्धी’! नागपूर-शिर्डी अंतर तब्बल १०२ किलोमीटरने कमी; आजपासून नागपूर-औरंगाबाद बसही धावणार

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता
Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
The Central Wildlife Board proposed a highway through the largest tiger project in the country
देशातील सर्वात मोठय़ा व्याघ्रप्रकल्पातून महामार्ग जाणार
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

समृद्धी महामार्गावरून सामाजिक कार्यकर्ता दीपक साने यांनी प्रवास केला. त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमातून लोकांना सांगितले. त्यांनी नागपूर पासून प्रवास सुरू केला. वाटते त्यांना कुठे हॉटेल, रेस्टॉरंट दिसले नाही. विशेष म्हणजे वाटेत पेट्रोल पंप दिसत नाही. दूर-दूर पर्यंत महिलांसाठी स्वच्छता गृह नाही. रस्त्यावर तहान लागली तर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. प्रवासा दरम्यान अपघात झाल्यास इस्पितळ, रुगवाहिका नाही, रात्रीच्या वेळी वाहन धारकांना कोणी लुटले तर पोलिसांची मदत केंद्र दूरपर्यंत कुठे दिसत नाही. साने यांनी समृद्धीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तेथे वरील अडचणी मागल्या. विशेष म्हणजे ५२० किमी च्या नागपूर-शिर्डी प्रवासा दरम्यान पहिले
नियंत्रण कक्ष औरंगाबाद जिल्ह्यात आहे.