लोकसत्ता टीम

चंद्रपूर: कोल्हापूर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत सार्वत्रिक करून कोल्हापूर दंगल सरकारची देण असल्याचे म्हटले आहे.

Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

वडेट्टीवार म्हणतात, कोल्हापुरची दंगल नियोजित होती. तिच्या संदर्भात सरकारकडे बोट निश्चितपणे जाईल. राज्यात गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये निवडणुकी बाबतचे सर्वेक्षण करण्यात आले. ते विरोधात गेल्यानंतर सरकारने राज्यात जातीय तेढ निर्माण करणे सुरू केले आहे. याचाच परिपाक कोल्हापूरची घटना आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, या सरकारने विश्वास गमावला आहे. मतांचे विभाजन करण्याशिवाय दुसरा पर्याय या सरकार समोर नाही. तसेच मुंबई वसतिगृहात झालेली घटना दुर्देवी आहे. उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचारात महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले आहे. सरकार स्वत:च्या सुरक्षेसाठी लढत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.