देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखाद्या लहान राज्याचा आकार असलेल्या विदर्भात आमदार आहेत एकूण ६२. त्यातले २९ भाजपचे. त्यात भर पडली शिंदे सेनेत गेलेल्या चारांची. म्हणजेच ३३ जण सत्तारूढ गटाचे. काँग्रेसचे १५ व राष्ट्रवादीचे सहा असे २१ विरोधी बाकावर. शिवाय दहा खासदार वेगळे. ते नेमके काय करत असतात हे फारसे कुणाला कळत नाही. असे एकूण पाऊणशे लोकप्रतिनिधी विदर्भाचे प्रतिनिधित्व करत असूनही कापूस खरेदीच्या मुद्यावर यापैकी कुणीही विधिमंडळ वा संसदेत आवाज उठवायला तयार नाहीत. आता गेल्याच आठवड्यातील घडामोड बघा. कांदा खरेदीच्या प्रश्नावर उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी पक्षभेद विसरून एकत्र आले व त्यांनी विधिमंडळ डोक्यावर घेतले. त्यामुळे सरकार तत्पर झाले. खरेदीची व्यवस्था व कांद्याला अनुदान जाहीर झाले. राज्यातील सर्वाधिक कांदा पिकतो तो नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यात. तरीही केवळ आमदारांच्या दबावामुळे हा मुद्दा राज्यभर गाजला. मग कापसाच्या बाबतीत असे का होत नाही? केवळ विदर्भच नाही तर मराठवाडा, खान्देश, उत्तर महाराष्ट्रात कापूस पिकतो. नगदीचे पीक अशी त्याची ओळख. इतर प्रदेशाचे सोडा पण सर्वाधिक पीक विदर्भात घेतले जात असताना येथील लोकप्रतिनिधी यावर गप्प का? या साऱ्यांचा घसा नेमका मोक्याच्या क्षणी का बसतो?

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar problems of cotton farmers in vidarbha region vidarbha cotton farmers issues zws
First published on: 23-03-2023 at 02:58 IST