लोकसत्ता टीम

नागपूर: पत्नी विरहातून मध्य प्रदेशातील एका व्यक्तीने पंधरा वर्षांपूर्वी दोन मुले व कुटुंब सोडून नागपूर गाठले. कुटुंबाशी संपर्कही तोडला. अपघातात जखमी अवस्थेत त्याला पोलिसांनी नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल केले. सेवा फाऊंडेशनने आर्थिक मदतीतून उपचार करवून घेतला. ही माहिती समाज माध्यमावर टाकल्यावर सदर व्यक्तीचे कुटुंब नागपुरात येऊन रुग्णाला घेऊन गेले. तब्बल पंधरा वर्षानंतर हा व्यक्ती घरी परतला.

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
UP Woman Elopes With Beggar
भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली, सहा मुलांना टाकून महिलेनं ठोकली धूम; पतीकडून गुन्हा दाखल

धरमसिंग असे रुग्णाचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील एका गावात शेतीकाम करत होता. लग्नानंतर हे कुटुंब आनंदाने जगत होते. त्यांना मुलगा व मुलगी असे दोन आपत्य झाली. मुले लहान असतांनाच पत्नीचे निधन झाले. त्यामुळे धरमसिंग दु:खी झाला. काही वर्षे स्वत:ची समजूत काढत तो मुलांचा सांभाळ करत होता. परंतु पत्नी जगात नसल्याच्या दु:खाने तो नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याने काम करण्याच्या नावावर स्वत:च्या १० ते १५ वर्षांच्या मुलगा व मुलीला भावाकडे सोडत नागपूर गाठले.

आणखी वाचा-अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

नागपुरात दोन वेळच्या जेवणाची सोय झाल्यावर तो रस्त्यावर कुठेही राहत होता. या काळात त्याने कुटुंबियांशी संपर्क तोडला. काही दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला. पायाचे हाड मोडलेल्या स्थितीत तो रस्त्याच्या कडेला पडून होता. पोलिसांनी त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. परंतु रुग्णाकडे एकही कागदपत्र नसल्याने शासकीय योजनेचा लाभ त्याला मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सेवा फाऊंडेशनला शस्त्रक्रियेसाठी आवश्यक इम्प्लांट व औषधांसाठी मदत मागितली. फाऊंडेशननेही पुढे येत हा खर्च उचलून मेयोतील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत यशस्वी उपचार केला. त्यात अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण व उपअधिक्षक डॉ. सागर पांडे यांची मदत झाली.

आणखी वाचा-लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

उपचारादरम्यान रुग्णाला सेवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलते करत त्याच्या गावाचे नाव जाणून घेतले. ही माहिती सेवा फाऊंडेशनकडून समाज माध्यमावर टाकली गेली. दुसरीकडे सेवा फाऊंडेशनच्या मध्य प्रदेशातील चमूलाही मदतीचे आवाहन केले गेले. या रुग्णाबाबतची माहिती समाज माध्यमावर प्रसारित झाल्यावर रुग्णाच्या कुटुंबियांनी मध्य प्रदेशात वाचली. तातडीने रुग्णाचा भाऊ व तामिळनाडूला नोकरी करणारा मुलगा नागपुरातील मेयो रुग्णालयात ३ डिसेंबरला पोहचला. दोघांनीही संबंधित वार्डात रुग्णाची भेट घेतली. अचानक रुग्ण व त्याचा भाऊ व मुलगा समोर आल्यावर सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले. तर दुसऱ्या दिवशी कुटुंबिय रुग्णाला घरी परत घेऊन गेले. सगळ्यांनी यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टर- परिचारिकांसह सेवा फाऊंडेशनचे आभार मानले.

Story img Loader