जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात आज सकाळी धुक्याचे साम्राज्य पहावयास मिळाले. रब्बी पिकांसाठी मात्र हे धुके घातक असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

बुलढाणा चिखली मार्गावर सकाळी अगदी दहा फुटांवरचेही अंधुक दिसत असल्याने सकाळीही वाहनांचे दिवे लागले होते. यामुळे वाहतूक रेंगाळली. चिखली तालुक्यातील केळवद परिसरालाही धुक्याने विळखा घातला होता.

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

हेही वाचा – नागपूरमध्ये तिरंगी लढतीत भाजपापुढे कडवे आव्हान; फडणवीस, गडकरी, बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला

हेही वाचा – बुलाढाणा : नात्याला काळिमा, काकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हा नजारा रसिकांसाठी सुखावणारा असला तरी अडीच लाख हेक्टरवरील रब्बी पिकांना व आंब्यासाठी मात्र घातकच आहे. सलग तीन दिवसांपासून असणाऱ्या या धुक्यामुळे फुलोऱ्यावर आलेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटणे, किडीचा प्रादुर्भाव व उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. गव्हाच्या ओंब्या लहान होऊन दाण्याचा आकार कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, सर्वाधिक पेरा असलेल्या हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हळद पिकालाही या धुक्याचा फटका बसला आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.