यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील देवधरी गावात विहिरीतील दूषित पाणी प्यायल्यामुळे १०० पेक्षा अधिक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली. आज, मंगळवारी सकाळी उजेडात आलेल्या या घटनेने गावात खळबळ उडाली असून, बाधित नागरिकांना पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा- गडचिरोली : सूरजागड लोहखाणीतील ट्रक चालकाचा आदिवासी महिलेवर बलात्कार; आरोपीस अटक

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
municipal administration not in favour of cut water even lowest water storage in mumbai lakes
पाणीकपातीची गरज नाही! महापालिका प्रशासनाची भूमिका

ग्राम पंचायतीचा गावात ‘फिल्टर प्लांट’ आहे, मात्र तो बंद असल्याने गावकऱ्यांना विहिरीतील पाणी प्यावे लागते. २००० साली गावात नळ योजनाही कार्यान्वित झाली, परंतु ही योजनाही आजपर्यंत प्रत्यक्षात अंमलात आली नाही. त्यामुळेच विहिरीतील दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सध्या गावात मानव मिशन अंतर्गत नवीन नळ योजनेचे काम सुरू आहे. दरम्यान, अतिसाराची लागण झाल्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी व चमू गावात दाखल झाली असून, विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.