नागपूर : छत्रपती शिवरायांच्या राज्यातील नांदेड जिल्ह्यातील बोंढारमध्ये अक्षय भालेरावची हत्या होणे हे गंभीर आहे. या राज्यात दलित, वंचित समाज सुरक्षित नाही, असा आरोप करीत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या प्रकरणात एसआयटी मार्फत तपास करून दोषींवर कारवाईची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

अक्षय केवळ दलित आहे म्हणून आणि गावात भीम जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने भोसकून त्याचा खून झाला, हे दुदैवी आहे. त्याच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न झाला ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात आज दलित सुरक्षित का नाहीत, असा प्रश्नही डॉ. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांपुढे उपस्थित केला.

thackeray Shiv Sena, Vijay Devane , Lakhs of Kolhapur Public , Spokespersons for Shahu Maharaj, Defeat Sanjay Mandlik, kolhapur lok sabha seat, lok sabha 2024, maha vikas aghadi,
लाखो जनताच शाहू छत्रपतींचे प्रवक्ते; तेच मंडलिकांना पराभूत करतील -विजय देवणे
Sudhir Mungantiwar-Kishore Jorgewar reunion Will campaign in the Lok Sabha elections
सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा

हेही वाचा >>>अमरावती : शरद पवारांना धमकी देणाऱ्या सौरभ पिंपळकरला तात्‍काळ अटक करा, राष्‍ट्रवादी काँग्रेस आक्रमक, पोलीस आयुक्‍तांना निवेदन

ॲट्रोसिटी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यावर बोट ठेवत त्यांनी यापूर्वी ॲट्रोसिटीच्या घटनेतील जवळपास ६३० कुटुंबातील अवलंबितांना अजूनही नोकरी मिळाली नसल्याकडेही लक्ष वेधले. अक्षय भालेराव खून प्रकरणी स्वतः जातीने लक्ष घालून पीडित कुटुंबास भेट देत त्यांना न्याय मिळवून द्यावा, कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी, कुटुंबातील एकाला नोकरी द्यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, या प्रकरणात सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.