scorecardresearch

Premium

“आमच्या वाटेला जाल, तर सोडणार नाही!” आमदार नितेश राणे यांचा इशारा, म्हणाले…

आगामी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कुणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही, असा आक्रमक इशारा नितेश राणे यांनी दिला.

Nitesh Rane Mansarovar Hall Amravati
"आमच्या वाटेला जाल, तर सोडणार नाही!" आमदार नितेश राणे यांचा इशारा, म्हणाले… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अमरावती : आगामी लोकसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची असून त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. कुणी आमच्या वाटेला निष्कारण जात असेल तर आम्ही त्याला अजिबातही सोडणार नाही, असा आक्रमक इशारा देत विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागेल, असे मत आमदार नितेश राणे यांनी येथे व्यक्त केले.

स्थानिक मानसरोवर सभागृहात आयोजित समाजमाध्‍यमांचा प्रभाव या विषयावरील बैठकीत ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण पोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रदेश सचिव जयंत डेहनकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आदी यावेळी उपस्थित होते.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

हेही वाचा – “राज्यातील दंगलींमागे उद्धव ठाकरेंचाच हात”, नितेश राणेंचा आरोप, म्हणाले “नार्को टेस्‍ट करा…”

अमरावती लोकसभेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा. कर्नाटकात अराजकता तयार होत आहे. सत्तांतर झाल्यानंतरचा हा बदल लक्षात घेण्यासारखा असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले. समाज माध्‍यमांचा वापर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. नऊ वर्षांत केलेल्या कामाचा आलेख हा फार मोठा आहे, असे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. काळजीपूर्वक समाजमाध्‍यमांचा वापर करून २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते.

हेही वाचा – राज्यात पशुवैद्यक विद्याशाखेचा विस्तार होणार; अकोल्यातील पदवी महाविद्यालय चालू सत्रापासूनच; १६४ पदांसह…

समाजमाध्यमातून सध्‍या अपप्रचार होत आहे. अशा अपप्रचाराला आपण आळा घालणे आवश्यक आहे. लोकांना सत्याची बाजू सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. नऊ वर्षांत एकही घोटाळा नसल्याने संपूर्ण विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ झाले आहेत, अशी टीका त्‍यांनी केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitesh rane was speaking at a meeting on the impact of social media held at mansarovar hall in amravati mma 73 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×