लोकसत्ता टीम

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भन्नाट कल्पना आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिध्द आहेत. नीरी येथील सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सरकारकडे फार पैसे नाहीत. त्यामुळे पीपीई मोडवर विकास कामे करायला हवी. नागपूर महापालिकेमध्ये असाच एक प्रयोग यशस्वी झाला असून यातून पालिकेला वर्षाला ३०० कोटींचे उत्पन्न मिळत असल्याची गडकरी यांनी दिली.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ

गडकरी म्हणाले सरकारकडे पैशाची कमी आहे. त्यामुळे आपण त्यावर अवलंबून न पीपीई मोडवर कामे करावी असा सल्ला दिला. गरज आधारित, प्रदेशाच्या अनुरूप तसेच तंत्रज्ञान, संशोधन, उद्यमशीलता, भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देशाला, समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन वैज्ञानिकांनी केले पाहिजे, असे आवाहन केले.

सिद्ध झालेले तंत्रज्ञान, कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसेच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय संशोधनाला महत्त्व नाही. नागपूर मध्ये असणारी फ्लाय एश, नाग नदीचे पाणी, कचरा, घनकचरा अशा गोष्टींवर संशोधन होणे आवश्यक आहे अशी सूचना नितीन गडकरी यांनी यावेळी केली.