यवतमाळ येथील आर्णी रोडवर कृषी नगरजवळ एका भरधाव कारचालकाने पादचाऱ्यांसह दुचाकी स्वार व हात गाडीवाल्यांना उडविले. यात दोन जण गंभीर जखमी झाले असून, पाच ते सहा लोक जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय उमरे (२०), दिलीप दारूटकर (४५) दोघेही रा. पुष्पकुंज सोसायटी,यवतमाळ अशी जखमीची नावे आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील अक्षयची प्रकृती गंभीर आहे. तर दिलीप यांच्या डोक्याला मार लागला असून पाय फ्रॅक्चर आहे.

विजय किसन चव्हाण (३०), रा. वाघाडी हा कार ( क्र. एमएच ४२, एएफ १००८) ने आर्णी मार्गाने वडगावकडे जात असताना कृषी नगर गेटजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी पदपथावर गेली. पद पथावर भाजी विकणाऱ्या हातगाड्यांना , दुचाकींना व वाहनचालकांना चिरडत पुढे गेली. या गाडीने पाच भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांना व तीन ते चार दुचाकीस्वरांना उडवले. ही धडक इतकी भीषण होती की रस्त्यावर भाजीपाला, दुचाकी आणि जखमी माणसं इतरत्र पडले होते. एका खांबाला धडकून ही कार थांबली. नागरिकांनी वाहनचालकाला गाडीबाहेर काढून चोप दिला. वाहनचालक विजय चव्हाण हा मद्य प्राशन करून होता.

private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Old Bhandara road, Nagpur , Old Bhandara road news,
रस्ते, उड्डाणपुलांमुळे प्रसिद्ध नागपुरात एक रस्ता असाही आहे जो २५ वर्षापासून…
traffic jam Katai Karjat State Highway Khoni Nevali village
Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले
Kalyan-Dombivli, Kalyan-Dombivli drivers ,
कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई
thane accident on old Kasara Ghat on Mumbai Nashik highway containers overturned
जुन्या कसारा घाटात अपघात, वाहनांच्या रांगा
1975 International Womens Year completing 50 years
स्त्री चळवळीची पन्नाशी: भगिनीभाव जिंदाबाद!
Over 20 vehicles stopped due to tire punctures on Washims Samriddhi Highway Sunday
वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद

हेही वाचा…विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अवधूतवाडी पोलीस, वाहतूक शाखा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. कारच्या चालकास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर कारची तोडफोड केली. यवतमाळ या पद्धतीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांचे व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा…प्रियकर की शिक्षक ! डीएनए ठरला पुरावा आणि न्यायालयाने ठोठावली शिक्षा

रस्त्यावर हातगड्यांचे अधिराज्य, पोलिसांचे दुर्लक्ष

यवतमाळ शहरात सध्या पोलिसांचा कोणताही वचक नाही. शहरात सर्व मुख्य रस्ते हातगाडीवाल्यांनी काबीज केले आहे. मंगळवारी अपघात झालेल्या आर्णी मार्गावर पद पथाच्याही पुढे मुख्य मार्गावर १० फुटपर्यंत भाजी, फळं विक्रेते अतिक्रमण करून रस्ता व्यापून असतात. नगर परिषद या हातगाडीवाल्यांकडून प्रतिदिन शुल्क घेतात. त्यामुळे नगर परिषद शहरातील या अतिक्रमणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो. वाहतूक शाखाही कारवाईची जबाबदारी नगर परिषदेकडे ढकलून नमनिराळी राहते. ही शाखा केवळ पेट्रोलिंग पुरती उरली आहे. वाहतूक पोलिसांचे वाहन सायरन वाजवत आले की, हातगाडीवाले क्षणात परागंदा होतात. पोलिसांचे वाहन पुढे गेले की, पुन्हा अवतरतात आणि रस्त्यावर अतिक्रमण करतात. त्यातून वाहनचालक आणि हातगाडीधारकांमध्ये अनेकदा वादाचे प्रसंगही घडतात. वाहतूक शाखासुद्धा ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कालच्या अपघातानंतर नागरिकांनी केला आहे.

Story img Loader