scorecardresearch

Premium

नवीन संसदेच्या उद्घाटनासाठी ओवैसींचा मोदींना पाठिंबा, पण घातली ‘ही’ एकच अट….!

संसदेचे संरक्षक हे लोकसभा अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांनीच नवीन संसदेचे उद्घाटन करावे. लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी माहिती ओवैसी यांनी दिली.

Owaisi supports Modi

नागपूर : संसदेचे संरक्षक हे लोकसभा अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांनीच नवीन संसदेचे उद्घाटन करावे. लोकसभा अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आम्ही पाठिंबा देऊ, अशी माहिती ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात दिली.

शनिवारी ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते. ओवैसी म्हणाले, लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचे संरक्षक आहेत. लोकसभेत अध्यक्ष हे सर्वोच्च पद आहे. पंतप्रधान हे संसदेतील कार्यकारी आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच उद्घाटन करायला हवे. तसे झाल्यास आम्ही कार्यक्रमातही सहभाग घेऊ. अध्यक्षांनी उद्घाटन केल्यास आकाश कोसळेल, असे पंतप्रधानांनी समजण्याचे कारण नाही. देशात लोकतंत्र आहे. त्यानुसार नागपुरात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आलो आहे.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

हेही वाचा – चंद्रपूर: ५० ट्रॅप कॅमेरे, पाच पिंजरे, शंभर वनकर्मचारी…अखेर वाघीण अडकलीच! सावली वन परिसरात घेतला होता चार जणांचा बळी

लोकसभेत नियमबाह्य ३७० कलम हटवण्याचा आम्ही विरोध केला होता. तेव्हा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्याला समर्थन दिले. आज दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केंद्र सरकारने त्या विरोधात वटहुकूम आणला. या मुद्यावर केजरीवाल रडत बसले आहे. आता या मुद्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयात भांडत रहावे लागणार आहे. भारतीय संविधानानुसार विशिष्ट वयानुसार प्रत्येकाला लग्नाचा अधिकार आहे. कोणी कोणाशी लग्न करावे, हे कोण ठरवणार व रोखणार आहे? महाराष्ट्रात लव जिहादच्या नावावर भाजपा आणि संघाने आंदोलन केले. त्यातून द्वेष पसरवण्याचे काम केले. भाजपाचे लोक रोजगार, शेतकरी आत्महत्यांवर बोलत नाहीत. लव जिहादच्या नावावर मुस्लीम समुदायाविरोधात द्वेष पसरवण्याचा काम केले जात आहे, असेही ओवेसी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 17:31 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×