नागपूर : सरकार दरबारी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावे म्हणून शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या संख्येत वाढ होत असली तरी प्रश्न सुटण्याची गती मात्र संथच असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या लोकशाही दिन, सेवा हमी कायदा या माध्यमातून सामान्य जनतेच्या समस्या वेळेत सोडवण्याचे प्रयत्न शासनदरबारी केले जात आहेत. आता त्यात पालकमंत्र्यांच्या ‘लोकसंवादा’ची भर पडली, हे येथे उल्लेखनीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाही दिन हा उपक्रम तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत राबवला जातो. रेशन कार्ड, जमिनीची मोजणी व तत्सम प्रकरणे तालुका स्तरावर सुटावी म्हणून तालुकापातळीवर लोकशाही दिन आयोजित केला जातो. तेथे समस्या सुटली नाही तर जिल्हापातळीवर दाद मागता येते, येथेही न्याय मिळाला नाही तर विभागपातळीवर तुम्ही दाद मागू शकता. परंतु, या उपक्रमाचे अनुभव अत्यंत निराशाजनक आहेत. लोकशाही दिनाला प्रमुख अधिकारीच उपस्थित राहात नाहीत. त्यामुळे प्रश्न सुटत नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platform complaint less comfort democracy day service guarantee act now lok sabha ysh
First published on: 17-05-2022 at 00:02 IST