अकोला : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालामध्ये १९९२ च्या दंगल प्रकरणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे नाव आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने पुरावे असतांनाही कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला. मतदानापूर्वी काँग्रेसने याचे उत्तर द्यावे असे,आव्हान दिले.

बाळापूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प १९९२ मधील दंगलीमध्ये एक हजार मुस्लीम मारले गेले होते. ३०० जण बेपत्ता झाले. त्यावर चौकशीसाठी सरकारने श्रीकृष्ण आयोग स्थापन केला. त्या प्रकरणात अनेकांवर दोषारोप लावण्यात आले. त्यावेळच्या काँग्रेस सरकारने नसिम अलिफ खान यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने न्यायालयात पोलिसांवर विश्वास नसल्याचे बयाण दिले. १९९९ नंतर सर्वोच्च न्यायालयात सरकारने गंभीरतेने हे प्रकरण चालवले नाही. १२ ऑगस्ट २०१२ ला ती याचिका फेटाळण्यात आली.

pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Godhra kand loksatta news
गोध्रा हत्याकांडातील आरोपीकडून लुटमारीचे गुन्हे, पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे; १४ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त
Highly educated youth participate in sheep fighting in Dombivli News
डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी लावण्यात उच्चशिक्षित तरूणांचा सहभाग; ३० जणांवर प्राणी इजा प्रतिबंधक कायद्याने गुन्हे दाखल
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
pcmc issue seized notice to Hotels hospitals schools and educational institutions over property tax arrears
पिंपरी : थकबाकी असलेले हॉटेल, रुग्णालय, शाळा होणार जप्त
municipal corporation has drawn up rules for developers to prevent air pollution during construction in city
ठाण्यातील विकासकांना काम थांबविण्याचे आदेश, हवा प्रदूषण रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेची कारवाई

हेही वाचा…सोन्याचे दर निच्चांकीवर असतांनाच पुन्हा बदल… हे आहेत आजचे दर…

u

शासनाने सर्वाेच्च न्यायालयात माफीनामा देऊन हे प्रकरण गांभीर्याने चालवण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरच्या सरकारने ते आश्वासन पाळले नाही. २२ ऑगस्टला ती याचिका फेटाळण्यात आल्याने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडितांची घोर निराशा झाली. श्रीकृष्ण आयोगाने एक हजार लोकांचा मृत्यू व ३०० जण बेपत्ता झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. पुरावे असल्यावरही काँग्रेसने दोषींवर गुन्हे दाखल का केले नाही, असे आमचे प्रश्न आहेत. काँग्रेसने २० तारखेपूर्वी त्याचे उत्तर द्यावे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. श्रीकृष्ण आयोगाने दंगलीचे वास्तव मांडले. श्रीकृष्ण आयोगाने दंगलीमागे शिवसेनाचा हात असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आता त्याच शिवसेनेसोबत आहे, अशी टीका देखील ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर उपस्थित होते.

हेही वाचा…नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?

सत्तेत सहभागी होणार

राज्यात आगामी काळात वंचित बहुजन आघाडी सत्तेत सहभागी होणार आहे. सत्ता कुणाची राहील आणि आम्ही कोणासोबत सत्तेत सहभागी होऊ, हे निकालानंतर स्पष्ट होईलच, असे सूतोवाच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. सत्ताधाऱ्यांचा पैसा पोहोचवण्याचे काम पोलीसच करीत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

Story img Loader