संपामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह उमटले होते. त्यावर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुढाकार घेत विनंती केली. मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त मंडळाचे अध्यक्ष व शिक्षक परिवारात आदरणीय म्हटल्या जाणारे रावसाहेब आवारी यांना विनंतीपर पत्र देत मंडळाने परीक्षा संचालित करण्याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले. संघटनेने आजवर मंडळास वेळोवेळी सहकार्य केले आहे.

हेही वाचा >>>नागपूर: ज्यांनी जंगल सांभाळले त्यांनाच अधिकारांपासून वंचित ठेवले! विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेची खंत

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
How Much Expenditure on Salary of Retired Contract Teachers
सेवानिवृत्त निवृत्त कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर किती खर्च? जाणून घ्या सविस्तर…
schools Maharashtra principals
राज्यातील २५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने बारावीचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्याचे निर्देश दिलेच आहेत. आपण आपल्या सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीत पार पडण्याचे आवाहन करावे, अशी विनंती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सायंकाळी केली. त्यास प्रतिसाद देत मुख्याध्यापक संघाने परीक्षा व्यवस्थित पार पडतील, याची दक्षता घेण्याबाबत मुख्याध्यापक सहकाऱ्यांना सूचित केले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित सांभाळून बेमुदत संपास सहकार्य करण्याचे निवेदन असल्याचे संघाचे पदाधिकारी सतीश जगताप यांनी सांगितले.