समृद्धी महामार्गावर लोकार्पणापूर्वीच धोकादायक वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आतापर्यंत झालेल्या दोन अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला.

या महामार्गाचे काही टप्प्यातील काम पूर्ण झाले. मात्र, अद्याप त्याचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. लोकार्पणाचा कार्यक्रम दोन वेळा स्थगित करून पुढे ढकलण्यात आला. निकृष्ट कामावरूनसुद्धा समृद्धी महामार्ग चर्चेत आहे.

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

मेहकर येथील काही व्यावसायिक औरंगाबाद येथून समृद्धी महामार्गावरून परत येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने तांदुळवाडी शिवारात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन महामार्गावरील दुभाजकाला आदळले आणि खड्ड्यात पडले. या भीषण अपघातात व्यावसायिक बळीराम खोकले यांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले.

अपघातात कार अक्षरश: चक्काचूर झाली. यापूर्वी देखील बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात होऊन दोन बळी गेले होते.