नागपूर : दिल्ली येथे सात दशकांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. आता संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित करण्याचा विचार आयोजकांकडून सुरू आहे.

३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना संमेलनाच्या उद्घाटनासाठी बोलवावे, शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ साधण्यासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधानच हवेत, अशी आग्रही मागणी साहित्य महामंडळाकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. महामंडळाकडून तसे संकेतही आयोजक संस्थेला देण्यात आल्याचे कळते. आयोजक संस्थेनेही पंतप्रधानांना निमंत्रण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; महायुतीच्या आमदारांशी साधणार संवाद
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
article about ugc revises vice chancellor selection process
समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…

हेही वाचा >>> लोकजागर : काँग्रेसचा ‘नागरी’ पेच!

यापूर्वी १९५४ मध्ये दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ होते. त्यावेळी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. या संमेलनानंतरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळ मिळाले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

महामंडळ – आयोजकांच्या भूमिका विसंगत?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी काँग्रेसच्या कार्यकाळात अनेकदा प्रयत्न झाले. तरीही मराठीला अभिजात दर्जा मिळाला नाही. मोदींच्या सरकारने मात्र तो दिला. अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच संमेलन आहे. त्यामुळे मोदींना या संमेलनात सन्मानाने बोलावले जावे, यासाठी साहित्य महामंडळातील काहींचा आग्रह आहे. संमेलनाला राजकीय स्वरूप नको असलेल्या आयोजक संस्थेतील काहींना मात्र हा आग्रह पटलेला नाही. परंतु, स्वागताध्यक्षपदी शरद पवार हे राजकीय नेते असल्याने मोदींच्या नावाचा विरोध कोणत्या तोंडाने करायचा, असा प्रश्न आयोजकांपैकी काहींना पडल्याचे कळते.

संमेलनाच्या उद्घाटकाचे नाव अद्याप ठरले नाही. पंतप्रधानांना उद्घाटनासाठी निमंत्रित करावे, असा विचार सुरू आहे. परंतु, पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे संमेलनस्थळी निर्माण होणारे प्रश्न व संमेलनाच्या मंचावर महामंडळाच्या शिष्टाचारानुसार बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबींवरही विचार केला जात आहे. – संजय नहार, संस्थापक अध्यक्ष, सरहद संस्था

Story img Loader