नागपूर : नागपूरपासून मुंबईपर्यत महापालिकेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. राऊत शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. राऊतांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत फूट अटळ असल्याचे स्पष्ट होत आहे.

राऊत म्हणाले, मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवायला हव्या. राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली. सरकार जे चांगले काम करते, विरोधी पक्षाने त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र ती परंपरा दुर्दैवाने भाजपने मोडली. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले. ईडी सीबीआयचा गैरवापर केला, अशी टीकाही राऊत यांनी केली.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “…अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार”, आदित्य ठाकरेंचा इशारा; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरही टीका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Thackeray groups protest against ST ticket price hike in thane
ठाकरे गटाचे एसटी तिकीट दरवाढी विरोधात आंदोलन
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार

हेही वाचा >>> भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात

 ‘कोण कुठे जाणार, हे फडणवीस ठरवणार नाहीत’

शुक्रवारी एका कार्यक्रमात फडणवीस यांनी राजकारणात काहीही घडू शकते, असे वक्तव्य केले होते. त्याला उद्धव ठाकरे यांच्याशी भाजपबरोबर वाढत असलेल्या जवळीकीचा संदर्भ होता. त्या अनुषंगाने पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोण कुठे जाणार, कुठे येणार हे फडणवीस ठरवणार नाहीत. प्रत्येक पक्षाची एक भूमिका, विचारसरणी असते. राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची परंपरा भाजप सोडणार असेल तर आम्हीस्वागत करू. पण तानाशाहीविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील.

Story img Loader