scorecardresearch

वाशिम: ‘स्ट्रीट लाईट’च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात

अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

soybean crops hundred hectares danger street lights washim
वाशिम: 'स्ट्रीट लाईट'च्या प्रकाशाने शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पीक धोक्यात; शेतकरी अनोख्या संकटात (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वाशिम: जिल्ह्यातून जाणाऱ्या-अकोला नांदेड महामार्गावर मोठंमोठे स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. हा महामार्ग शेताजवळून गेलेला असल्याने पिकांवर दिवसा सूर्यप्रकाश तर रात्री दिव्यांचा प्रकाश पडत आहे. यामुळे किडे प्रकाशाकडे आकर्षित होत असून पीक परागीकरण प्रक्रिया थांबली आहे. परिणामी पिकांना फुल धारणा व शेंगाच उगवत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास शंभर एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील सोयाबीन पिके धोक्यात आली आहे.

वाशिम जिल्ह्यातील अकोला ते नांदेड या चौपदरीकरण महामार्गावर लावण्यात आलेल्या दिव्यांच्या प्रकाशाचा फटका पिकांना होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. या महामार्गावर जवळपास दोनशे फूट परिसरात दिव्याच्या प्रकाशामुळे पिकांना हानी होत असल्याचे दिसून येत आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

हेही वाचा… कुणबी-ओबीसी संघटनामध्ये मतभेद? विशाल मोर्चानंतर नेमके काय घडले…

जिल्ह्यातील जेथे जेथे उड्डाण पूल आहेत. त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावण्यात आले आहेत. त्या परिसरातील पिकांची वाढ होत आहे. मात्र फुल धारणा होत नसून पिकांना शेंगा आलेल्या नसल्याची तक्रार शेतकरी वर्गातून झाल्यानंतर कृषी विभागाकडून देखील काही ठिकाणी पाहणी करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्रातील कृषी शास्त्रज्ञ भारत गीते यांना विचारणा केली असता रस्त्यावरील दिव्यामुळे जवळच्या पिकांची हानी होत असल्याचे सांगून पिके वाढत आहेत परंतु त्याला फुले व शेंगाचं लागत नसल्याचे सांगितले. आधीच दुष्काळी परिस्थिती असताना आता नवीनच संकट शेतकऱ्यावर उद्भवले असून याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soybean crops on hundreds of hectares are in danger due to the light of street lights in washim pbk 85 dvr

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×