चंद्रपूर : शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-२०२५’चे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. एसएनडीटीच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, यूएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक राजेश इंगोले, महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

C P Radhakrishnan emphasized combining education technology and research for developed agricultural sector
अकोला : ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची जागतिकस्तरावर मोठी झेप, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Forest dept probes elephant procession in Pirangut
आमदाराची हत्तीवरून मिरवणूक कार्यकर्त्यांना महागात; संयोजकासह सांगलीच्या श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या अध्यक्षावर गुन्हा
India Climate Change Inflation Agriculture Farmers
व्यवसायाभिमुख पिके हवीत!
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
subhash sharma padma shri award
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’, यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच…
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

हेही वाचा >>>अनारक्षित रेल्वे तिकीट खरेदी आता ‘हायटेक’ ,तीन टक्के बोनसही; वाचा कसा लाभ घेता येणार?

लोकसंख्या वाढत आहे आणि त्यानुसार गरजाही वाढत आहेत. निसर्गाने दिलेल्या संसाधनांचा वापर वाढल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पाण्याची बचत आणि वृक्षांचे रक्षण या पर्यावरणाचे संवर्धन अवलंबून आहे. आपण या दोन्हींकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे राज्यपाल म्हणाले.याप्रसंगी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केले. संचालन रेणुका देशकर, तर आभार विलास नानीवाडेकर यांनी मानले.

 मुनगंटीवार यांची  त्रिसूत्री

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे प्रतिपादन आमदार मुनगंटीवार यांनी केले. ते म्हणाले, ‘सी’ फॉर चंद्रपूर, ‘सी’ फॉर ‘क्लायमेट चेंज’च्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘खूप झाल्या चर्चा; आता कृती हवी’

परिषदेत फक्त भाषण ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होईल. चिंता व्यक्त होईल. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये,  उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. जेव्हा ‘क्लायमेट चेंज’चा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्यात चंद्रपूरचे नाव असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Story img Loader