वर्धा : 12th Exam Start Today आजपासून बारावीच्या परीक्षेस सुरवात होत असून अतिसंवेदनशील शाळांवर निगराणी ठेवण्यासाठी थेट तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरसकट कॉपी चालणाऱ्या शाळांची अतिसंवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून नोंद करण्यात आली आहे.राज्यात अशा पाचशेवर शाळा आहेत. या ठिकाणी पूर्ण वेळ बैठे पथक राहणार असून भरारी पथक आकस्मिक तपासणी करणार.

हेही वाचा >>> नागपूर: परीक्षेच्या काळात मुले अभ्यासाचा कंटाळा करतात; पालकांनो ही युक्ती वापरून बघा

design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Summer vacation has been announced for schools in the state When will the school start
राज्यातील शाळांना उन्हाळी सुटी जाहीर… शाळा सुरू कधी होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती…
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

अशा केंद्रात एखाद्या वर्गखोलीत कॉपी आढळून आल्यास खोलीवर कार्यरत शिक्षकास निलंबित करण्याचे मौखिक आदेश देण्यात आले आहे. यानंतर संवेदनशील व साधारण अशी परीक्षा केंद्राची वर्गवारी आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक या दोन वरिष्ठांवर एकूणच परीक्षा निकोप व्हाव्या म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.