खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच महापालिका शाळांमधील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. मात्र या १८०० टॅबपैकी ४०० टॅब खराब झाले तर काही गहाळ झाले. त्यामुळे या टॅब खरेदीची आता चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, आधीच आर्थिक संकटात असलेल्या महापालिका प्रशासनाला पुन्हा टॅब खरेदी करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनामुळे शाळा, कॉलेजांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा मिळावी यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने सुमारे २८ शाळेतील १८०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. दहावी व बारावीचा निकाल लागल्यानंतर हे टॅब शाळेच्या माध्यमातून महापालिकेच्या शिक्षण विभागाला परत करणे आवश्यक होते. मात्र गेल्यावर्षी देण्यात आलेल्या १८०० पैकी केवळ ३०० टॅब परत आले असून ४०० टॅब खराब झाले आहेत. ज्यांना टॅब देण्यात आले होते त्यातील अनेकांनी ते शाळेत परत केले नाही. त्यामुळे शिक्षण विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्या कंपनीला टॅब खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते त्या कंपनीला याबाबत विचारणा केली जाणार असून तसे पत्र महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० टॅब गहाळ झाले तर ५२ टॅब तुटले आहेत. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले मात्र परीक्षेच्या काळापर्यंत आवश्यक असलेले सिमकार्ड व इंटरनेट कनेक्शनचा पत्ता नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात या टॅबचा उपयोग करताच आला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The 400 tabs given to the students went bad procurement process will be investigated amy
First published on: 01-07-2022 at 14:14 IST