scorecardresearch

नागपूर: प्रशासनाला प्रतीक्षा गावा-गावातील ‘अमृत कलश’ ची, काय आहे प्रकरण?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आला आहे.

The administration is waiting for the 'Amrit Kalash' in villages
प्रशासनाला प्रतीक्षा गावा-गावातील ‘अमृत कलश’ ची

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आला आहे. उर्वरित २,५२३  गावांमधून येणाऱ्या कलशांची प्रतीक्षा प्रशासनाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने देशभरात हा उपक्रम राबण्यात येत आहे. याअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान विविध गावांमधून माती गोळा करून अमृत कलश पाठवायचे आहेत.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी नागपूर विभागात या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तयार झालेल्या अमृत कलशाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. यावेळी त्यांना ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावांमध्ये या उपक्रमला गती द्या, लोकसहभाग वाढवा, अशा सूचना बिदरी यांनी दिल्या. १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून आलेले अमृत कलश पंचायत समिती कार्यालयात जमा करायचे आहे.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

हेही वाचा >>> कुर्मी समाजाच्‍या आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर रेल्‍वे वाहतुकीत बदल; ‘या’ गाड्या भुसावळ, बडनेरापर्यंतच धावणार…

तेथून तालुका कार्यालयात पाठवायचे आहे. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्व तालुक्यातील कलश मुंबई येथे गोळा करतील. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. १ नाव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये वापरण्यात येणार आहेत. बैठकीला विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. उपायुक्त (विकास) डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (प्रशासन) प्रदीप कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The administration is waiting for the amrit kalash in villages cwb 76 ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×