वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. रात्री नऊ वाजता विद्यापीठ प्रशासन व आंदोलक यांच्यातील चर्चा यशस्वी झाली. विद्यापीठाचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी विद्यार्थ्यांना एका पत्रातून तीन विविध पर्याय देत मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा- नागपूर : रेल्वेत आढळली १३९९ बेवारस मुले; कौटुंबिक समस्या, शहराच्या आकर्षणामुळे घर सोडले

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
aicte directed question papers of technical education courses in two language
पुणे: तंत्रशिक्षणाची प्रश्नपत्रिका आता भाषासुलभ! काय आहे ‘एसआयसीटीई’चा निर्णय?

आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बजावण्यात आलेली नोटीस मागे घेण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. अखेर विद्यार्थ्यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर आंदोलन व उपोषण मागे घेतले. आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण असल्याची बाब ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने निदर्शनास आणली होती. विद्यार्थी नेते योगेश जंगीड याने स्पष्ट केले की, ‘लोकसत्ता’ने आमच्या तीव्र भावना निदर्शनास आणल्यानंतर तडजोडीच्या भूमिकेस वेग आला. प्रशासन पुढे आले. चर्चा झाली व मार्ग निघाला. आम्ही प्रथम विद्यार्थीच आहोत, आंदोलक नाहीत.