नागपूर : गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे निघू न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत शनिवारी सकाळी निघणार आहे. १४१ वर्षांची परंपरा असलेली काळी व १३७ वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत मिरवणुकीचे मुख्य आकर्षण हे विविध समस्यावर भाष्य करणारे बडगे ( पुतळे) असतात.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Loksatta editorial Government bans sugar mills from producing ethanol
अग्रलेख: धडाडांची धरसोड!
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

जागनाथ बुधवारी व मस्कासाथ परिसरातून काळी व पिवळी मारबत शहीद चौक, मस्कासाथ परिसरात येऊन तेथे दोन्हीची गळाभेट केली जाते आणि नंतर त्यांची सुरुवात होऊन शेवटी दहन केले जाते. गेल्या काही वर्षात या मारबत व बडग्याच्या मिरवणुकीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून केवळ नागपुरातील नाही तर विदर्भातील लोक मारबतीची मिरवणूक पाहण्यासाठी येतात आणि विशेष म्हणजे, या एका दिवसाच्या मिरवणुकीमुळे अनेकांना रोजगार देखील प्राप्त होतो.