अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा आज मुंबई येथे विधानसभेत उपस्थित झाला. आमदार विकास ठाकरे यांनी या महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली.

हेही वाचा >>>वाशीम : अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश

In front of BJP candidate Navneet Rana Congress workers shouted slogans like Vare Panja Aya Panja
जेव्‍हा नवनीत राणांसमोर ‘वारे पंजा…’च्या घोषणा दिल्या जातात…
Jalna lok sabha election २०२४, congress, Dr kalyan kale
डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीने जालन्याची लढत आता लक्षवेधक ठरणार
koyta gang marathi news, market yard koyta gang marathi news
पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय: मार्केट यार्डमधील आंबेडकरनगर परिसरात दहशत, तरुणाला जीवे मारण्याची धमकी
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

डॉ. आंबेडकर भवन पाडण्यांविरुद्ध गुन्हे दाखल व्हावे, ही जमीन शासनाने खासगी कंपनीकडून परत घ्यावी आणि त्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात यावे. या मागण्यांसाठी अंबाझरी उद्यानाजवळ महिलांचे साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने उद्यानाची २४ एकर आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची २० एकर जमीन अशी एकूण ४४ एकर जमीन मे. गरुडा ॲम्युझमेंट पार्क लि. या कंपनीला विकसित करण्यासाठी दिली आहे. या कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी डॉ. आंबेडकर भवन पाडले आणि येथील झाडेही कापली, असा आरोप डॉ. आंबेडकर स्मारक (अंबाझरी) बचाव समितीचा आहे. विकासक वेगवेगळ्या माध्यमांतून आंदोलनकर्त्यांवर दबाव निर्माण करीत आहे. यासंदर्भातील पत्र आमदार विकास ठाकरे यांना देण्यात आले आहे. त्यानंतर आज ठाकरे यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा >>>एका प्रदेशाध्यक्षाला यशाने तारले, दुसऱ्यापुढे कर्तृत्वसिद्धतेचे आव्हान

ते म्हणाले, अंबाझरी येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्यात आले. त्याविरोधात आंबेडकरी समाजाच्या ५०० महिला गेल्या ५० दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत. नागपुराच्या हिवाळी अधिवेशनात मोर्चा देखील काढण्यात आला होता. परंतु, आता या आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार होत आहे. ज्या कंपनीला ही ४४ एकर जागा जमीन विकसित करण्यास देण्यात आली आहे. त्या कंपनीकडून हा प्रकार होत आहे. मला यासंदर्भातील पत्र मिळाले आहे. ५० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. भर उन्हात उपोषण करीत असलेल्या या महिलांची शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्या मागण्यांवर विचार करावा.