दिग्रस तालुक्यातील महागाव येथे गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. गोकुळ दत्ता टेटर (१७) आणि सोपान बबनराव गावंडे (१७), दोघेही रा. महागाव, अशी मृतांची नावे आहेत. शुक्रवारी घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी हे दोघे आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते.

गणपती विसर्जन करून ते घरी परतले. त्यानंतर गणपती मूर्ती पाण्यात बुडाली की नाही हे पाहण्यासाठी दोघेही परत नाल्यावर गेले. मूर्ती बुडाली नसल्याने नाल्यात उतरून त्यांनी मूर्ती खोल पाण्यात नेली. पाण्याचा अंदाज न आल्याने मूर्तीसह दोघेही बुडाले.

mumbai accident, mumbai accident 2 died
मुंबई: हेल्मेटशिवाय दुचाकीवरून तिघांची सफर जीवावर बेतली; दोघांचा मृत्यू, दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

हेही वाचा : नागपूरमध्ये भीषण अपघात; फ्लायओव्हरवरून ८० फूट खाली पडून चौघांचा मृत्यू

डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप

उपस्थित नागरिकांनी दोन्ही मुलांना तत्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी २० मिनिटे त्यांना बघितलेच नाही, ऑक्सीजन लावले नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळेच मुलांचे जीव गेल्याचा गंभीर आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण होते. आर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत.