लोकसत्ता टीम

अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक वृद्धा गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार, १० डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास परतवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारणी मार्गावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ घडली.

Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
Why are indigenously made Dhruva helicopters frequently involved in accidents
स्वदेशी बनावटीच्या ध्रुव हेलिकाॅप्टर्सचे वारंवार अपघात का होत आहेत?
kalyan MNS citizens road agaitationTruck crushes mother, child
कल्याणमध्ये ट्रकने आई, मुलाला चिरडले; मनसेसह नागरिकांचे रस्ता रोको
Assam Assam Coal Mine Rescue
Assam: दुर्दैवी घटना! आसाममध्ये २०० फूट खोल बेकायदा कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह काढला; ९ जण अद्यापही अडकलेलेच
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम

गजानन शनवारे (३५) रा. घाटलाडकी, चांदूरबाजार व अजय जामूनकर (३०) रा. भुलोरी, चिखलदरा अशी मृतकांची नावे आहेत. या अपघातात गंभीर झालेल्या वृद्धेला परतवाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गजानन शनवारे हे दुचाकी क्रमांक एमएच २७ बीए ७८४९ ने वृद्धेसह चिखलदरा तालुक्यातील मुसंडी येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी जात होते.

आणखी वाचा- लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’

त्याचवेळी अजय जामूनकर हे दुचाकी क्रमांक एमएच २७ डीएफ ०१३६ ने विरुद्ध दिशेने जात होते. मार्गात श्रीकृष्ण मंदिराजवळ दोघांच्याही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात गजानन शनवारे व अजय जामूनकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वृद्धा गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

दहा महिन्‍यांत १२८ जणांचा मृत्‍यू

जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकूण ४७३ अपघात झाले आहेत. २३९ प्राणांतिक अपघातांत २७० जणांचा मृत्यू झाला. त्यात २४७ पुरुष, तर २३ महिलादेखील होत्या. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूणच अपघातांत घट झाली आहे. एकूण ४७३ अपघातांत नऊ अपघात हे समृद्धी महामार्गावर झाले तर एनएएचआय, पीडब्ल्यूडी व एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील राष्‍ट्रीय महामार्गावर एकूण ९१ अपघातांची नोंद झाली, तर २१५ अपघात हे राज्य महामार्गावर झाले. शहरी रस्त्यावर ४१ तर ग्रामीण भागातील रस्त्यावर एकूण १०७ अपघातांची नोंद झाली. २७० अपघाती मृत्यूंपैकी सर्वाधिक १२८ मृत्यू हे राज्य महामार्गावर झाले. जून व सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक ६० जणांचा मृत्‍यू झाला.

आणखी वाचा-अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले

२४८ जण कायमचे जायबंदी

दहा महिन्यांत १२३ अपघात गंभीर होते. त्यात सुमारे २४८ जण कायमचे जायबंदी झाले. कुणाचा पाय, कुणाचा हात तर कुणाला अन्य अवयव कायमचा गमवावा लागला. त्यातही २१६ पुरुष, तर ३२ महिला आहेत. ९७ किरकोळ अपघातांत १७६ पुरुष व ३३ महिला असे एकूण २०९ जण जखमी झाले.

Story img Loader